
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट मिळालेल नाही. एकनाथ खडसे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला पक्षाकडू अशी कोणतही अपेक्षा नव्हती असं खडसे यांनी म्हटलं आहे. मला राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे. असं मी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळं माझ्या नावाची चर्चा असली तरी मला अपेक्षा नव्हती असं त्यानी म्हटलं आहे.
भाजपने संजय काकडे यांचाही पत्ता कट केल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी रामदास आठवले आणि उदयनराजेंची नावं घोषित झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा सुरु होती. मात्र त्यांना तिकीट दिलेलं नाही.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे.