
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सावरगावच्या मेळाव्यात दिलेल्या भाषणामुळे अमित शाह आणि पंकजा मुंडे यांना सामान्य नागरिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. अमित शाह यांनी भाषणात स्थानिक प्रश्नांविषयी कोणतेच मुद्दे मांडले नाहीत. यावर सामान्य नागरिकांनी पंकजा मुंडे आणि अमित शाह यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. अमित शाह आणि पंकजा यांनी कलम 370 आणि देशभक्तीच्या मुद्द्यांवर जोर दिला. याच मुद्द्यावरुन बीडच्या नागरिकांनी या दोन नेत्यांना प्रश्न विचारले आहेत.
कलम 370 रद्द केल्या मुळे अमित शहा ला सावरगाव (बीड) येथे 370 तोफांची सलामी …
अरे वाह,
हा मुद्दा झाला का प्रचाराचा?
आता तरी सुधर रे
जेवढ्या शेतकऱ्यांचा खून झाला (आत्महत्या नाही खून आहे तो )मोटाशेट तेवढे तुमच्या पक्षाचे नेते न तुम्ही त्या तोफेच्या तोंडी जा
तेवढाच भार कमी होईल..
— Kundan chavhan (@Kundanchavhan01) October 8, 2019
भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा आज बीड मध्ये येणार आहेत त्यांनी सभेत बोलताना शेतकऱ्या विषयी मंदी बेरोजगारी या संदर्भातच बोलावे याशिवाय काहीही बोलणे योग्य नाही सध्या महाराष्ट्राला गरज आहे शेतकऱ्याच्या जगण्याची बेकारांना गरज आहे जगण्याची
— Shivaji Bhosale (@Shivaji98896957) October 8, 2019
आज दसऱ्या निमित्त मोटाभाई बीड मधील सावरगाव (घाट) येथे
येणार आहे. अन मोठा भाई आला म्हणजे भाषण तर नक्कीच करणार .
तर त्या भाषणात कलम ३७० रद्द केला . पाकिस्तानची पूर्ण जिरवली ,
या शिवाय दुसरे काही बोलणारच नाही. अरे थु तुझ्या राजकारणावर,
अन तुझ्या त्या राजकीय पदावर .@RJagdalePatil pic.twitter.com/f8lewYeH6n— JARE CHANDRAKANT (@JareChandrakant) October 8, 2019
बीड मध्ये दर वर्षी दुष्काळ पडतो.पाण्यासाठी वणवण करावी लागते.जनावरे चारा आणि पाण्याअभावी मरतात.
आणि हे तडीपार महाशय 370 कलम वर सभा घेतंय.
याला कोणीतरी भाषण करण्याअगोदर स्थानिक पातळीवर च्या समस्या सांगत जावा.
नाहीतर लोकं बडवतील याला.
— Salman Khan (@BeingSalman2802) October 8, 2019
स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष न देता आम्ही कशा प्रकारे कलम 370 रद्द केलं हे लोकांना सांगू नका अशा प्रकारचे ट्वीट केलं आहे. कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा आहे का? अशा प्रकारचे प्रश्न ट्वीटच्या माध्यमातून विचारले जात आहेत. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच देशातील आर्थिक मंदी, बेरोजगारी या विषयावर अमित शहा यांनी बोलावं. पंकजा मुंडे यांनी दरवर्षी प्रमाणे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपली हजेरी लावली होती. त्यांच्या भाषाणामध्ये कोणत्याही स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली नाही, त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारले.